येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र या मुद्द्यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार टोलेबाजी सुरु आहे.
“काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यामुळे त्यांचे नाव घेतले की त्यांच्या पोटात दुखायला लागते. त्यांनी काहीही केलं तर लोक विरोध करत राहतात”, असा टोला राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोविंदगिरी महाराज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.
राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोविंदगिरी महाराज यांनी ही टीका केली. काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव घेतले की त्यांच्या पोटात दुखायला लागते. मोदींनी काहीही केलं तरी हे लोक विरोध करत राहतात, अशी टीका करतानाच करोनाच्या काळात लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी अयोध्याला जाणे गरजेचे आहे, असंही गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं.