मुंबई : देशात महामारीच्या संसर्गाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. देशात दररोज लाखोंच्या संख्येने महामारीने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावसोबत रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. परिणामी आरोग्ययंत्रणा कोलमडत असल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत, आलेल्या लसींच्या तुटवड्यामुळे अनेक राज्यांमध्ये, अनेक ठिकणी अडथळे येताना दिसून येत आहेत. तसेच, जगभरातील या महामारीच्या विषाणूवरील लशींच्या किंमतींची तुलना करता, भारतातच लसींचे दर जास्त असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सीरम व भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याच आवाहन केलं आहे.
देशात उत्पादन होत असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे दर राज्यांना ६०० रुपये व खासगी रुग्णालयांना १२०० रुपये असे लावण्यात आले आहेत, तर सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीचे दर राज्यांना ४०० रुपये व खासगी रुग्णालयांना ६०० रुपये इतके जाहीर केले आहेत. यामुळे देशभरातून अनेक पक्षाच्या नेत्यांनी, तसेच सामान्य नागरिकांनी केंद्र सरकारला सवाल विचारले आहेत. परंतु, भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांनी लशींच्या वाढीव किमतीचे समर्थन केले आहे.
Govt asks Serum Institute, Bharat Biotech to lower price of COVID vaccines as India gears up to inoculate all aged above 18: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2021