दिल्ली : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी कोण स्वतः आपलं घर सोडतो. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं, असं काँग्रेसमधुन बाहेर पडल्यानंतर गुलाब नबी आझाद म्हणाले.
“विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
सोनिया गांधी यांनी १९९८ ते २००४ दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं काम केलं. त्या ज्येष्ठ नेत्यांकडून सल्ला घेत होत्या. त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांचे सल्लेही ऐकत होत्या. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यापैकी सात राज्यांमध्ये मी विजय मिळवून दिला होता. त्या कधीही हस्तक्षेप करत नव्हत्या. परंतु २००४ नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि ही पद्धत संपली. सोनिया गांधींचं राहुल गांधीवरील अवलंबत्व वाढलं. परंतु राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही. राहुल गांधींशी सर्वांनी समन्वय साधावा असं त्यांना वाटतं, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे.
चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
ज्या लोकांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काही दिसते ते योग्य नाही. जर कोणी इतकंच अशिक्षित असेल, तर त्यानं पंतप्रधानांचं भाषण ऐकावं. मोदींनी लग्न केलं नाही, त्यांची मुलं नाहीत.. मी त्यांना क्रूर समजत होतो, परंतु त्यांनी माणूसकी दाखवली, असही गुलाब नबी आझाद म्हणाले.
“तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
गुलाब नबी आझाद यांनी गेल्या आटवड्यात काँग्रेस सोडताना सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहिले होते. त्यात त्यांंनी काँग्रेसमध्ये चांगली व्यवल्खा असल्याचे म्हटले होते. सोनिया गांधींच्या काळात ते कायम होते. मात्र राहूल गांधींच्या काशात सर्व काही कोलमडले. याशिवाय 2014 मध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार धरत. त्यांनी मंत्रिमंडळाने काढलेला अध्यादेश फाडला होता. त्यामुळे खुद्ध पंतप्रधान आणि सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, असही आझाद म्हणाले.
Read also
- “राष्ट्रवादीकडे अनेक जण आकर्षित, काही राज्यात भाजपची सत्ता गेलीय, त्यामुळे जोमाने काम करा”
- “पुन्हा मंत्रिपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल”; गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादीचा टोला
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज
- “गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”