दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या दणदणीत विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज तब्ब्ल ३ तास राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची, त्यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, या दोघांची भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे.
आगमी २०२४ साली होणाऱ्या निवडणुकांत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत असून, लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपलं मत प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केलं असून, आघाडी सरकार पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालं आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाले, तर आम्हाला आनंदच होईल,’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रशांत किशोर-शरद पवार भेटीचं समर्थन केलं आहे.
तसेच, ‘सध्या देशात सगळा एकतर्फी कारभार सुरू आहे. देशहितासाठी राजकारणाला चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय गरजेचा आहे. देशात झालेल्या काँग्रेसच्या वाताहतीमुळे भाजपचं फावलं. मात्र, सध्याच्या राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू पवार साहेब आहेत. राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाले, तर आम्हाला आनंदच आहे,’ असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.
Read Also :
- का भेटले प्रशांत किशोर शरद पवारांना? अजित पवारांनी केला खुलासा
- २०२४ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार – नाना पटोले
- ‘बाळासाहेब आज असते, तर त्यांनीच विमानतळाला नाव नाकारले असते!’ – छगन भुजबळ
- ‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका
- ‘पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा’