औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. प्रत्येक राजकीय पक्षातील नेते या मुद्यावर भाष्य करताना दिसत आहे. आता दुर्दैवाने मी आमदार झालो नाही, अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता, असं वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.
2018 साली हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना जाधव यांनी असे वक्तव्य केले आहे.
हर्षवर्धन जाधव म्हणाले की, संभाजीराजे ज्या पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार आहेत, त्याच भाजपची केंद्रात सत्ता आहे. 300 पेक्षा अधिक खासदार भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठीचा प्रस्ताव आणण्यासाठी संभाजीराजेंनी भाजपला भाग पाडावं, असा सल्ल त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर भाजप आणि महाविकास आघाडीत चिखलफेक सुरू आहे. केंद्रात बहुमत असलेल्या भाजपने संसदेत विधेयक मंजूर करून आरक्षणाचा अधिकार राज्यांना द्यावा. भाजप विधेयक आणत नसेल तर विरोधी पक्षांनी संसदेत स्थगन प्रस्ताव आणावा. विधेयक मंजूर झाल्यास मराठ्यांसह गुजर, जाट, पाटीदार या जातींनाही आरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत की काय?’
- पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन निर्णय घेणार – अजित पवार
- ‘मुख्यमंत्र्यांनी कॅबिनचा चेहरा पाहिला नाही, कॅबिनेने कधी मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही’
- संभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा; अजित पवार म्हणाले, अजून 9 दिवस बाकी आहेत
- ‘संभाजी छत्रपतींना कुणीही राजीनामा मागितलेला नाही’