नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी, त्यांनी शहा यांच्याशी सहकार तसेच इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली. तसेच, या दोन्ही नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार केला. महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या या थेट भेटीने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.
मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात; संजय राऊतांनी भाजपला फटकारले
तसेच, या भेटीत राजकीय पुनर्वसन करण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली असण्याची शक्यता सांगितली जात आहे. कारण दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाला आता दोन-अडीच वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही भाजपत त्यांना, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं असं कोणतंही पद किंवा जबाबदारी दिली गेली नाहीये, ही बाब लक्षात घेतली तर, या पार्श्वभूमीवर देखील या दिग्गज नेत्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या काळात, राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते मानले जात होते. त्यामुळे या दोघांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग ७ वर्षांपेक्षाही अधिक काळ सहकार मंत्री होते. दोन्ही नेत्यांचा राज्यातील राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. तसेच, दोघेही राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक आहेत.
देशाचे गृहमंत्री व नवनिर्वाचित सहकार मंत्री मा.@AmitShah जी यांची दिल्ली येथे भेट घेतली. pic.twitter.com/VEhST6ZSET
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) August 10, 2021
मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…
दुसरीकडे, गेल्या ३ दिवसांपासून भाजपच्या पहिल्या फळीतील सगळे नेते दिल्ली दरबारी होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी जुन्या आणि नव्या खासदार-आमदारांची भेट झाली. या बैठकीत राज्यातील राजकारणाला घेऊन अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसेच, आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे अमित शहांची भेट घेऊन, त्यांच्याशी तासभर खलबतं केल्याने, राज्याला घेऊन दिल्ली दरबारी काय शिजतंय? असा सवाल उपस्थित होत आहे.
Read Also :
- पुणे महापालिकेतल्या भाजपची जनतेच्या पैशांवर फुकट फौजदारी; जनहित याचिका खर्चाला स्थायीची मंजूरी
- प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- चोरीच करायचीय तर स्वखर्चाने तरी करा, ती पण जनतेच्या पैशांनी करताय? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रताप सरनाईकांनाच्या कामाशी बरोबरी करून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
- महादेव जानकरांचा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, म्हणाले “आता त्यांनी ठरवायचं दुसऱ्यांच्या घरात…”