कोल्हापूर: हसन मुश्रीफ यांनी सन 2021 च्या दिवाळीची पहिली आंघोळ कोल्हापूर शहरवासीयांना थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालू, असे वचन यापूर्वी दिले होते. परंतु, या योजनेच्या अपुऱ्या कामामुळे वचनाची पूर्तता होत नसल्यामुळे आज कोल्हापूर शहरवासियांची जाहीर माफी मागितली. कोरोना महामारीची परिस्थिती व तांत्रिक अडचणीमुळे ही योजना अपुरी असल्याचा खुलासाही मुश्रीफ यांनी या बैठकीत केला.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
शासकीय विश्रामगृह येथे काळम्मवाडी धरणाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर शहरातील जनतेला शुध्द, मुबलक आणि थेट पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने काळम्मवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. मात्र मे 2022 अखेर कोल्हापूर वासियांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी असे आश्वासनही मुश्रीफ यांनी या वेळी दिले.
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
हे पण वाचा, कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
शहराला थेट पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. सुमारे 450 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतुद करण्यात आली असून या कामाकरिता निधीची अजिबात कमतरता जाणवणार नाही. जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असे ठेकेदाराला निर्देश देवून श्री. मुश्रीफ यांनी 2022 साली येणारी दिपावली तमाम कोल्हापूरवासियांच्या जीवनात आनंद निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर 2021 च्या दिपावली सणामध्ये आपण कोल्हापूर वासियांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करु शकलो नसल्याबद्दल शहरवासियांची क्षमा मागितली. लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल.
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
या योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे 95 टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तसेच कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे केवळ तीन किलो मीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पुर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आतापर्यंत सुमारे 5 कोटी 30 लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक श्रीमती बलकवडे यांनी दिली. तर हर्षजीत घाटगे यांनी या योजनेचे सादरीकरण केले.
हे पण वाचा, सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आर.के.पवार तसेच महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.
हे पण वाचा, शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
हे पण वाचा, नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी