सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राणेंच्या अटकसत्रानंतर शिवसेना वि. राणे वाद आणखी तापला. दोन्ही बाजूंमध्ये वाकयुद्ध सुरू झालं. अद्यापही वाकयुद्ध सुरूच आहे. राणेंना अटक करायला पोलीस आले असताना त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास झाला. मात्र कालपासून राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली.
“राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
कालपासून राणे त्यांचं होमग्राऊंड असलेल्या सिंधुदुर्गात आहेत. आज यात्रा सुरू असताना राणे व्यासपीठावर होते. त्यावेळी त्यांना संरक्षणमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा फोन आला. राजनाथ यांनी राणेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. राणे व्यासपीठावर असल्यानं तिथे माध्यमांचे कॅमेरे होते. त्यामुळे सिंह आणि राणे यांच्यातला संवाद कॅमेऱ्यात कैद झाला.
मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा
आपली प्रकृती अतिशय उत्तम असल्याचं राणेंनी सिंह यांना सांगितल. ‘माझी तब्येत आता चांगली आहे. मी रुग्णालयात ऍडमिट नव्हतो. मी रुग्णालयात गेलोच नाही. यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. आताही मी यात्रेतच आहे. तब्येत बरी नसल्याची हवा त्यांनी केली होती,’ असं राणेंनी सिंह यांना सांगितलं. प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल त्यांनी सिंह यांचे आभार देखील मानले.
Read Also :
- “अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
- एकनाथ खडसे यांच्यावरील होणारी ED ची कार्यवाही राष्ट्रवादीच्या फायद्याची; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
- नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
- वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही; नारायण राणेंनी पुन्हा ललकारले