मुंबई – शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाहिला आहे. पण, चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला “सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट केले “कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला…..!!! सच हमेशा कडवा होता है…….!!!! मानो या न मानो….!!!!”
मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेची प्रशंसा केली. ते म्हणालेत की “मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावूक झाले होते. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत.”
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शेवटच्या १० मिनिटात आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवला आहे. हा प्रसंग शिवसैनिकाला भावूक करणारा आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १. ९० कोटी रूपयांचा गल्ला जमवला.
केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्याच्यावर नाहीतर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यानी सोपविली होती.सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला…..!!!
सच हमेशा कडवा होता है…….!!!!
मानो या न मानो….!!!! pic.twitter.com/g5MxPQzVVS— Shalini Thackeray (@ThakareShalini) May 16, 2022
Read also:
- शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा देऊन राज्यसभेतील उद्धव ठाकरेंचा डाव गुंडाळला?
- आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात, थोडक्याच बचावले जगताप
- कार्ती चिंदमबरम यांच्या तब्बल 11 ठिकाणी सीबीआयचे छापे; चिंदमबरम यांच्या अडचणीत वाढ
- संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर; शरद पवारांचा संभाजीराजेंना पाठिंबा
- शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात; दिलीप वळसे पाटील यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत