जालना : नीती आयोगाने सप्टेंबर-ऑकटोबर महिन्यात, देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे एका पत्रकात सांगितले आहे. दरम्यान, नीती आयोगाच्या ‘त्या’ पत्राची राज्यात चर्चा होत असून, या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात महामारीची तिसरी लाट कधी येणार? राज्य सरकारची त्या अनुषंगाने कितपत तयारी झाली आहे? काय उपाययोजना सुरु आहेत?, या सगळ्यावर भाष्य केलं.
“पारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो…”, अण्णा हजारेंचा ज्योती देवरेंना सल्ला
“नीती आयोगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे जे सूतोवाच केले आहे. ते पत्र जून महिन्यातील असून, राज्यातील नागरिकांना सध्यातरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. सध्या आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्यात तिसरी लाट आली, तरी राज्य सरकार तयार आहे. सध्या तरी मंदिरे आणि शाळा, कॉलेज उघडण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच या आस्थापना उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
राज्यातील ऍक्टिव्ह #कोरोना रुग्णांची जिल्हा निहाय आकडेवारी, दिनांक २२ ऑगस्ट २०२१.#coronaupdatesindia #IndiaFightsCorona #missionbeginagain #BreakTheChain#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी#मी_जबाबदार pic.twitter.com/v7cU1WTLox
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) August 22, 2021
“लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, या भ्रमात राहू नये. संसर्ग हा तरीही होऊ शकतो. त्याची परिणामकारकता लसीमुळं कमी होते. शकते. लसीमुळे पुन्हा बाधित रुग्णाला आयसीयूची गरज भासत नाही. ऑक्सिजनची गरज कमी प्रमाणात लागते. ज्या देशांत लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्याठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणावर असला, तरी मृत्यूदर कमी झालेला दिसतो,” असे त्यांनी सांगितले.
“१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
तसेच, भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर भाष्य करता त्यांनी, “कुठल्याही बाबतीत गर्दी टाळली पाहिजे,” असे आवाहन केले आहे. ७ जिल्ह्यांत कोरोना बाधित रुग्णांची वाढली असली, तरी काळजीची परिस्थिती नाही. लसीकरण वाढवण्याचा विचार आहे,” असे ते म्हणाले.
Read Also :
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
- महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
- “भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट
- नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना