मुंबई: कोरोनासारखे संकट मोदी सरकारने गांभीर्याने न घेतल्याने आज देशाचे मश्नान होता दिसत आहे. कोरोणाचे सावट त्सुनामीसारखे संकट असल्याचा इशार १२ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी दिला होता. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते भाजपा नेत्यांपर्यंत कोणीची गांभीर्याने न घेतल्याने ही परिसस्थी आज देशावर ओढावली आहे. दर दिवसाला देशात कोरोनामुळे किती तरी मुंले अनाथ होत आहे. तसेच देशात चार लाखाहुन रुग्ण तर चार हजाराहुन मृत्यूमुखी पडत आहेत. या सर्व परिस्थीला केंद्रसरकारचा बेजबादार पणा आहे. देशाचे स्मशान बनविणाऱ्या नरेंद्र मोदींच्या पापावर सोनिया गांधी यांना पत्र लिहुन पाघरुन घालण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांना पत्र लिहण्याची ऐवढीच हाऊस असेल तर त्यानी मोदीना पत्र लिहण्याचे साहस करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
मोदीच्या वाराणसीत मृतदेहाचा रोजच्यारोज पडतोय ढिग
नाना पटोले म्हणाले की, कोरोना ही काय ताप खोकल्याचा आजार नाही, ही एक राष्ट्रीय आपती असून, याबाबतचे सर्व अधिकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे राखून ठेवले आहेत. तसेच राज्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. राज्यांना पाहिज्या त्या ताकदीने कोविड लस पुरवण्यात अपयशी ठरत आहे, सर्व यांचे खापर राज्याच्या डोक्यावर फोडतांना दिसत आहे. पंतप्रधानाच्या वाराणसीत तर मृतदेहाचा दिवसाला ढिग पडत आहे. वाराणसीची परिस्थी हाताबाहेर गेल्याने, भाजप नेत्यांना परिस्थी नियंत्रणात आण्यासाठी नाकीनव येत आहेत. वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. सत्तर वर्षांत कधी भारताची झाली नव्हती, एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे, असेही नाना पटोले म्हणालेत.
राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद पडलीत
मोदी सरकारने राज्यांना लसीकरणाच्या बाबतीमध्ये तर वाऱ्यावच सोडले आहे. जग लसीकरणात व्यस्त असताना मोदी मात्र निवडणुकीमध्ये प्रचार करण्यात बिजी होते. केंद्रसरकारकडे लसीकण्याच्या बाबतीत राष्ट्रीय धोरणच नाही. राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणा केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. तर काही लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गीवर आहेत. राज्यांना लस पुरवण्यात केंद्र सरकार स्पसेल अपयशी ठरले आहे. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली असताना केंद्राला १५० रुपये, राज्यांना ४०० रुपयांना, खासगी व्यक्तींना ६०० रुपयांना ती विकत का घ्यावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगासह जागतिक स्तरावरही मुंबईच्या कोरोना नियंत्रण मॉडेलचे कौतुक केले आहे.