पुणे : पुणे महापालिकाच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने घाईघाईने स्थापन केलेल्या महानगर नियोजन समितीला आता मुंबई हाय कोर्टाने स्थगिती दिली आहे. हाय कोर्टाच्या निर्णयांनंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (PMRDA) गुरूवारी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या हद्दीमधील ८०० गावांच्या विकास आराखड्यापैकी पुणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या २३ गावांचा विकास आराखडा देखील थांबणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भात १६ जुलै २०२१ रोजी काढलेल्या शासन आदेशाला आव्हान देणारी याचिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने न्यायालयात दाखल केली होती, अशी माहिती पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासू; शिवसेना आक्रमक
राज्य सरकारने घाईने आराखड्याच्या प्रक्रियेसाठी कायद्याने आवश्यक असलेली महानगर नियोजन समिती स्थापन केली. परंतु, या समितीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींचा समावेश करणे कायद्याने आवश्यक असून देखील राज्य शासनाने बेकायदेशीररित्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार तानाजी राऊत आदींना घेण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच, या समितीची स्थापना बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी, या मागणीसाठी महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर आणि अन्य काहींनी हाय कोर्टात दाद मागितली. यावरून हाय कोर्टाचे न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठाने आज त्यास स्थगिती दिली आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश जून अखेरीस करण्यात आला. राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार आणि पुणे महापालिकेचे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांच्यात या गावांच्या विकास आराखड्यावरून कुरघोडी सुरु आहे. यावरून राजकारण चांगलंच रंगलं आहे. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी इरादा जाहीर करण्याचा ठराव तातडीने बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. मात्र, PMRDA चा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आला होता आणि त्यात त्यांनी या २३ गावांचा आराखडाही केला होता. मात्र गावे महापालिकेत आली असल्याने या गावांचा आराखडा आम्हीच करणार, असल्याची भूमिका देखील भाजपने घेतली. नंतर या २३ गावांचा आराखडा पीएमआरडीएने आधीच केलेला असल्याने तोच मान्य करावा, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली.
Read Also :
- “राहुल गांधींना मातोश्री, बाळासाहेब आणि शिवसेना जाणून घेण्यात इंटरेस्ट”- संजय राऊत
- ‘भाजपच्या काळात खासदारही गॅसऐवजी चूल वापरू लागले’; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- “ओबीसींसाठी कळवळा असेल तर त्वरित सत्तेतून पायउतार व्हा!” चंद्रशेखर बावनकुळेंचे काँग्रेसला आव्हान
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”