सांगली : “पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीत केलं. बेधडक वक्तव्यांनी खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा घसरली.
…तर मावळात राष्ट्रवादीचा आमदार ९० हजार मतांनी कसा निवडून आला? पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न
“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं संभाजी भिडे सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी म्हणाले.
अजित पवार अडचणीत येणार; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या दादांच्या सहीचा कागद दाखवणार
“या देशात देशभक्तीचा, स्वतंत्रचा, भक्तीचा आपण कोण आहोत, या जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती. तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.
Read Also :
- तुम्ही चारवेळा मुख्यमंत्री होते, पण माझ्यासारखं सलग पाच वर्ष राहता आले नाही; फडणवीसांचा पलटवार
- वेळ देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही; 25 ऑक्टोबरपासून संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार
- रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल? किरीट सोमय्याचा सवाल
- २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू, उदय सामंत यांची माहिती; वाचा नवी नियमावली
- मोठी बातमी: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा निर्णय