बॉलिवूडमधी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील आणि आपल्या सर्वांना आनंद देतील अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
अनिल देशमुख म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन हे कोरोनावर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भूमिका घेऊन परततील. “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा.”
महानायक अमिताभ बच्चन जी हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भुमिका घेऊन परततील, "शहेनशाह" कोरोनाची "दिवार" तोडून "अग्निपथावर" मात करुन आपल्याला "आनंद" देतील हीच सदिच्छा
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 11, 2020