मुंबई : पालकमंत्री अस्लम शेख यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रेस्टाँरंट, मॉल आणि दुकानं यांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स आणि रेस्टाँरंट मालक संघटनांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आज कॅबिनेटमध्ये या संदर्भात आणखी चर्चा होणार आहे. पुढील १ किंवा २ दिवसात SOP जाहीर होईल, असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.
मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात; संजय राऊतांनी भाजपला फटकारले
पुढे अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन टप्या टप्याने शिथिल करणं योग्य ठरेल. जी परिस्थिती आता केरळमध्ये आली आहे. ती आपल्याडे येऊ नये यासाठी आपल्याला जपून पाऊल उचलावं लागेल. परत कोरोना वाढता कामा नये, असंही ते म्हणालेत. त्यामुळे मॉल आणि रेस्टाँरंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दोन लस पूर्ण केल्यास त्यांनाही काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. विरोधी पक्षांनी कितीही दबाव टाकला तरी तसं काही त्यांच्या मनाप्रमाणे होणार नाही. शाळा उघडण्याबाबत दोन्ही बाजू मांडल्या जातायत. टास्क फोर्सचेही मत योग्य आहे. अचानक केसेस वाढल्यास पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा
आम्हाला लस मिळत नाही म्हणून आम्ही लस उपलब्ध करू शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्धं करून दिली पाहिजे. त्यामुळे लोकांचे हाल होत असल्याचं ते म्हणालेत. केंद्र सरकार लस वितरणात दूजाभाव करत आहे. त्यामुळे राज्याला लस कमी मिळत आहे. हे आता सर्वांना माहित असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी केंद्रावर दबाव टाकून राज्यासाठी अधिक लस मिळवून द्यावी. केंद्राकडून पुरेसा लस पुरवठा होत नसल्यानं कित्येकदा लसीकरण केंद्रे बंद करावी लागतायत, असंही ते म्हणालेत.
मुंबईत निवडून आलेल्या नगरसेवकाचे पद रद्द; अपात्र नगरसेवकांनी मात्र तब्बल ४० लाख रुपये गिळले?
राजीव गांधी यांनी देशात नवीन टेक्नॉलॉजी आणली. मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्यांचं नाव काढत आहेत. त्यामुळं हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. जेवढे ते नाव संपवण्याचा प्रयत्न करतील तेवढे त्यांचे नाव वरती येत राहील. नवीन योजना कुठलीही न आणता जुन्या योजनांची केवळ नाव बदलली जाताहेत. ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावे स्टेडियमला दिली जातायत, अशी टीका अस्लम शेख यांनी केली.
Read Also :
- महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव
- राज्यात तोंड उघडणारे दानवे-राणे, मराठा आरक्षणावर संसदेत तोंड का उघडत नाहीत? राऊतांचा संतप्त सवाल
- मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
- आघाडी सरकार, तुमची इयत्ता काय? न्यायालयाने सीईटीवरून फाटकारल्यानंतर भाजपने लगावला टोला
- “आरक्षणावर बोलण्याची संधी दिली जावी,” छत्रपती संभाजीराजेंची उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी