पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. यामध्ये भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या विस्तारात अपक्ष आमदार आणि महिला आमदारांचा समावेश नसल्याने विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. तर याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांना स्थान दिल्याने आज सामनातुन शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडण्यात आले तर काॅंग्रेस नेते सचिन सांवत यांनी देखील निशाणा साधला आहे.
“ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
शिंदे सरकारमध्ये शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना स्थान देण्यात आले. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हा शिंदे गटाच्या प्रश्न असे म्हणून आशिष शेलार यांनी हात झटकणे हा भाजपाचा दांभिकपणाचा कळस आहे. मग मविआ सरकारमधून राजीनामा द्यावा ही मागणी भाजपा नेते एकनाथ शिंदे यांना विचारुन करत होते का? जनतेला भाजपा किती मूर्ख समजते ते दिसून येते. असा टोला देखील सचिन सावंत यांनी लगावला.
“शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामी आहे. मंत्रिमंडळाचा पळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातुन करण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
राज्याच्या कल्याणासाठी नक्की काय करणार आहे? शिंदे गटाचे जे लोक मंत्री झाले ते महाविकास आघाडीतही मंत्री होते. त्यातील संजय राठोड यांच्यावर अनेेक प्रकारचे गंभीर आरोप भाजपनेच केले होते. भाजपच्या आरोपांमुळेच राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले होते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात राठोड यांना सळो की पळो करून सोडले. आता फडणवीस त्याच राठोडांच्या मांडीस मांडी लावून बसतील, असा टोला सामनातून लगावला आहे.
Read also
- “आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
- “उशिरा आलेल्यांना पहिल्या पंगतीत अन् पहिले जे आले त्यांना शेवटी”; मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची नाराजी
- “फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”
- मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
- फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू