मुंबई : ८ ऑगस्टला संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा करत, ज्या नागरिकांनी लसीचे २ डोस घेतले असतील, त्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, असं जाहीर केलं. तसेच, दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस झाले असतील, त्याच नागरिकांसाठी हा पास उपलब्ध असेल. रेस्टॉरंट, जीम, मॉल याठिकाणी या पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे आहे”, असे देखील नंतर सांगण्यात आले.
केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे, घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका
या पार्श्वभूमीवर, नेमकी लोकल प्रवासाची परवानगी कशी मिळेल, हा पास कसा आणि कुठे मिळेल, लोकल प्रवासाच्या नोंदणीसाठी बनवण्यात येणार असलेलं मोबाईल ऍप कधी सुरू होणार? या सगळ्याविषयी मुंबईकरांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. त्यावर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या २ दिवसांत मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी नोंदणीचं मोबाईल ऍप तयार केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना, “राज्य सरकार आणि रेल्वे मिळून ही योजना तयार करत आहेत. यात मुंबईतल्या ६५ रेल्वे स्थानकांवर लोकांना क्यूआर कोड मिळणार आहे. येत्या २ दिवसांत त्या ऍपची निर्मिती केली जाईल. लोकल प्रवास करणाऱ्या जवळपास ३२ लाख प्रवाशांसाठी हे ऍप तयार केले जात आहे”, असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीत, २०२४ मध्ये भाजप मुक्तची घोषणा, अशी असणार रणनिती
तसेच, “नियमाप्रमाणे दुसऱ्या डोसनंतर १५ दिवसांनीच पास मिळणार आहे. मात्र तो लगेच मिळणार नाही, त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. यांनतरच लोकल प्रवासाची परवानगी म्हणून ३ गोष्टी दिल्या जातील. तिकीट, पास आणि क्यूआर कोड. त्यामुळे, तिकीट खिडक्यांवर मुंबईकरांनी गोंधळ करून हुज्जत घालू नये. रांगा लागल्या तरी हरकत नाही. पण स्वत:ची काळजी घ्या”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Read Also :
- बीड जिल्ह्यामधून निघणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला, पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध
- पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी: संजय कुटे होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?
- महाराष्ट्र पेटवायला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही, संभाजीराजे म्हणतात…..
- शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची माणिकराव ठाकरे यांनी केली तक्रार; आघाडीत धुसफूस?
- दिल्लीत भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यत?