परभणी : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये 49 व्या राज्य अजिंक्यद व निवड चाचणी कब्बडी स्पर्धेंचे उद्घाटन झाले. यावेळी कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं? हे मी कबड्डीतून शिकलो असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
“आमच्याकडे एक सुशी ताई, पण वरच्या मजल्यावर घनदाट अंधार”; मनसेची खोचक टिका
यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, कबड्डी हा ताकदीचा आणि स्किलचा खेळ आहे. त्यामुळे या खेळात टांग कशी ओढायची, कोणाची कॅच कशी करायची, समोरच्याला कसं टिपायचं आणि एखादा खेळाडू एकतच नसेल तर त्याला ग्राऊंडच्या बाहेर कसं पुश करायचे हे या खेळात मी शिकलो असल्याचं महाजन यांनी म्हटलं.
“शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात
राजकारणातही मी तेच केलं, कोणाची टांग कशी खेचायची, कोणाला कसा बाद करायचा, कोणाला कसं पाडायचं हे मी खेळातून शिकल्याचे महाजन म्हणाले. यावेळी राज्यभरातील 25 मुलांचे आणि 25 मुलींचे असे एकुण 50 विविध जिल्ह्यातील कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
Read also
- ‘आप युवा संवाद’ मेळावा खेड आळंदी मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा: मयुर दौंडकर
- “गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
- “शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल
- “मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
- अजब प्रेम की गजब काहाणी.! 2 जुळ्या बहिणींनी एका तरूणासोबत लग्न केल्याने गुन्हा दाखल..! महिला आयोग चौकशी होणार?