मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देहूत, एका खाजगी दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा, कार्यक्रमात मंचावरून एकाने पाटील यांचा ‘माजी मंत्री’ असा उल्लेख केला. तेव्हा पाटलांनी ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,’ असं म्हणत तर्क-वितर्काना उधाण आणलं. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटीलांना टोला लागलेला असून, ‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार आहेत, असं कानावर आलं,’ अशी टीका त्यांनी केली आहे.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
‘राजकीय विरोधक असले तरी, ते सर्वांचे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका, त्यांची वेदना मी समजू शकतो, पण त्यांना निरोप आहे. पुढची २५ वर्ष तुम्हाला माजीच राहावं लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात हे सरकार किमान २५ वर्षे चालवु. त्यामुळे, २५ वर्ष मनाची तयारी ठेवा. स्वप्न बघा! त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही,’ असं म्हणत, ‘नागालँडचे राज्यपाल म्हणून चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली आहे. म्हणून माजी मंत्री म्हणू नका, असं ते म्हणाले असतील,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला.
‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
दरम्यान, यावर आता पाटील यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले असून, राऊत यांच्या विनोदी टीकेला पाटील यांनीही त्याच शैलीत उत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार असल्याचं मला कळत आहे,’ असं म्हणत पाटील यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, ‘संजय राऊतांना कोणी फार गांभीर्याने घेत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांमधील ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध हा चर्चेचा विषय बनला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया
दुसरीकडे, पाटीलांच्या वक्तव्यावर आज मुख्यमंत्र्यांनी देखील टिपण्णी केली आहे. ‘माझ्या कानावर असं आलं आहे की चंद्रकांत दादा तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात हशा पिकवला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात भाषणाला सुरुवात करताना, भाजप नेत्यांकडे बघून, ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. त्यांनतर राजकीय वर्तुळात युतीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहेत.
Read Also :
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी
- ‘काही जण दिल्लीत जाऊन फक्त उभेच राहतात’, उद्धव ठाकरे
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
- महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर