अमरावती : अलिकडेच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मोतोश्री इंदिराबाई कडू यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी बेलोरो येथे त्यांच्या तेरविचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमावेळी चांदूर बाजारचे पोलीस निरिक्षक सूनील किनगे यांनी बच्चू कडू यांच्योसमोर एक भजन गायले. त्यानंतर सुनील किनगे यांचे तेरविच्या कार्यक्रमातील भजन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आईने अलिकडेच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आईच्या निधनाची बातमी समजताच गावात दुख:चा डोंगर कोसळला. आईच्या निधनाची बातमी कळताच अमरावतीवरून गावाला बच्चू कडू पोहचले. त्यांनी त्यावेळी म्हटलं की, माझ्या आयुष्याला वळण देणारी माझी आई मला सो़डून गेली. याचे फार मोठे दु;ख झाले आहे. दुपारी आईच्या निधनाबाबत त्यांनी अशाप्रकारे ट्विट केलं होतं.
एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला
त्यानंतर बच्चू कडू यांच्या आईचा तेरविचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यावेळी चांदूर बाजारचे पोलीस निरिक्षक सुनील किनगे यांनी त्यावेळी भजन गायले. सुनिल किनगेे यांनी गायलेले भजन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रावणाचा जीव बेंबी, तसा काहींचा जीव मुंबईत अडकला; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आहेत. अमरावती येथील खासगी रूग्णालयात त्यांच्या आईवर उपचार सुरू होते. मात्र त्यांची अखेरची झुंज अपय़शी ठरली त्यामुळे त्यांच्यावर 13 मार्च रोजी रविवारी बेलोरा ता. चांदुर बाजार अमरावती येथे सकाळी 10 वाजता अंत्यविधी करण्यात आले.
Read also:
- ” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब
- सतेज पाटीलांसह त्यांच्या कुटुंबिंयाबाबत ईडीकडे तक्रार करणार; कोल्हापूर उत्तरेत राजकारण तापलं
- “ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली
- पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी
- मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला