मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना काळामध्येही राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी करोना कालावधीमध्ये महाराष्ट्राला संभाळण्याचं काम सर्वांनी मिळून केल्याचं सांगत आभार मानले. सर्वांच्या सहकार्यानेच कठीण कालावधीमधून आपल्याला वाटचाल करणं शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!
उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि वरिष्ठ सनदी अधिकारी सहभागी झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांआधी सुभाष देसाई आणि आदिती तटकरे यांची भाषणं झाली. या भाषणांमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या कठीण कालावधीमध्ये राज्याला सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करणारं नेतृत्व दिल्याबद्दल भाष्य केलं. याचाच संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, “माझं कौतुक होत आहे की या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कसं नेतृत्व केलं; कसा महाराष्ट्र संभाळला. पण हे श्रेय आहे ते माझं एकट्याचं नाही. माझे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सारे कर्मचारी अगदी सफाई कर्माचारी सुद्धा आणि साहजीकपणे आपल्या राज्यातील नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेली साथसोबत महत्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळेला दिली नसती तर हे कठीण होतं,” असं म्हणत सर्वांचे आभार मानले.
शिवसेना खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा; ‘ती’ याचिका मुंबई हायकोर्टाचा फेटाळली
एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली जात आहे. या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Read Also :
- “आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”
- शिवसेना अडचणीत येणार? रश्मी – उद्धव ठाकरेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार दाखल; कारवाई होणार?
- अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल
- मोठी बातमी : अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, काय विचारपूर केली…
- “भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर