मुंबई : बंडखोर आमदार रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांच्या वैयक्तिवर टिका टिप्पणी केल्याने राज्यात एक वाद निर्माण झाला आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्याराज्यात रामदास कदम यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचे प्रतिकात्मक पुतळे देखील जाळण्यात आले. यातच आता रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे.
नारायण राणे बाहेर पडल्यानंतर शिवसेना कोणी वाचवली? छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर गेल्यावर नागपुरातून आमदारांना मुंबईला कोणी आणलं? याची या लोकांना कल्पना नाही आहे. उद्धव ठाकरे एक वर्ष मला गाडीत बसवल्याशिवाय मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. शिवसेना फुटली त्याच दु:ख मला आहे. तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार? हा निर्णय घ्यायचा होता. उद्धव ठाकरेंशी बोललो तेव्हा दोन पाऊले मागे या आपला पक्ष वाचवा, गुवाहटीवरून आमदारांना मी आणतो सांगितलेलं. मात्र, शरद पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी कायद्याची लढाई लढत असल्याचं म्हटलं होत. असं वक्तव्य बंडखोर आमदार रामदास कदम यांनी केलं आहे.
“जर निर्मला सीतारामण यांना वेळ असेल, तर मी स्वत: फिरून त्यांना बारामती दाखवेन;” सुप्रिया सुळे
यातच औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, आज शिवसेना महाराष्ट्रातच नसून ती देशभरात पसरलेली आहे. उद्धव ठाकरेंनी देशभर पक्षाचे नेटवर्क तयार केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना सुरूवातीपासूनची आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना युती काळात मंत्री केले, आधी ते उद्धव ठाकरेंचा आदेश मानायचे. पण, आता अचानक काय झालं आहे की, शिवसेनाच फोडायला निघाले आहेत. असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे? हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल”; शंभुराज देसाई
मुळात हे एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शिंदे त्यांच्याकडे गेले. पृथ्वीराज चव्हांणानी त्यांना अहमद पटेलांना भेटण्यास सांगितले. शिंदेंनी प्रयत्न केला, पण पुढे काही झालं नाही. रामदास कदम हे देखील राष्ट्रवादीत जाणार होते, पण बाळासाहेबांनी त्यांना रोखले. आता हेच दोघे मांडीला मांडी लावून बसले आहेत. असा मोठा खुलसा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
Read also
- “एकनाथ शिंदें काॅंग्रेसमध्ये तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण..;” चंद्रकांत खैरेंचा मोठा खुलासा
- कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड
- “पवार साहेब तुम्हीच सांगा..! 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?”; भाजपचा सवाल
- “भाजपला टक्कर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असं सध्या लोकांना वाटतेय”
- रामदास आठवलेंच्या पक्षातील सचिवांनी केला शिवसेनेत प्रवेश; थेट पक्षचं केलं सेनेत विलीन