अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरुन अमृता फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. ‘मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं सुरक्षित नसल्याचं वाटतंय’, असं त्या म्हणाल्या.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे.त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वक्तव्य करुन या प्रकरणात उडी घेतली आहे.
अमृता फडणवीस यांनी लिहिलं आहे की, “ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. ”
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live – for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020