मुंबई – पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना मिळालेल्या यशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अदृश्य हात होते. असा दावा एका भाजप नेत्यानं केलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द केले. मात्र या मागे शरद पवार यांचे अदृश्य हात का नव्हते असा सवाल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अदृश्य हाताचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवारसाहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत; पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीनतेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 5, 2021