जळगाव : मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पद असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही असं बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
“नागपुरची चड्डी ज्याने घातली, तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो”; नाना पटोलेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार कसे निवडून येतात. ते आम्ही बघून घेऊ असं वारंवार आदित्य ठाकरे सांगत आहेत. तर एकनाथ शिंदेंनी देखील जर चाळीस च्या चाळीस आमदार निवडणुन आले नाही तर गावाकडे जाऊन शेती करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जोरदार रंगत बघण्याची शक्यता आहे.
पोहरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून सेनेत प्रवेश..! बंजारा समाजाचे महंतांचा सेनेला पाठिंबा
माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, या ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपुर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Read also
- “जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…;”सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
- “शाळेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झालेच पाहिजे”; छगन भुजबळांचा आग्रह
- “पेंग्विन सेनाच महाराष्ट्राची भरभराट करणार”; पेडणेकरांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- “शिवाजी पार्कवर काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असणार”; भाजपने सेनेला डिवचलं
- “सरकार पडल्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याची टिका