जळगाव : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. आता सगळ्यांनाच या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी या निकालाबाबत एक सुचक वक्तव्य केलं असून त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे.
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर सध्याचं सरकार कोसळणार. त्यामुळे राज्यात दुसरा पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लागेल. असं जंयत पाटलांनी म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत जर कायद्याने होणार असेल तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरतील. अन् सरकार कोसळेल. याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाकरे गटाकडून १६ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला असून आपलं म्हणणं सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलं आहे. या प्रकरणाबाबत युक्तिवाद झाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपीठ काय निर्णय देणार ? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला जात आहे.
Read also
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द