नवी दिल्ली : राज्यात पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबई सारख्या प्रमुख शहरांत महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता पंजाबच्या विधानसभेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहेत.
राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
भाजपकडून दिल्लीतील महानगरपालिकेची निवडणुक टाळण्याचे संकेत असून त्यावर केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर दिल्ली महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्यात भाजप विजय झाला तर मी राजकारण सोडून देईन असं थेट आव्हान केजरीवाल यांनी भाजपला दिलं आहे. त्यामुळे या आगामी निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागून आहे.
काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
भाजपवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याबाबतच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूरी दिली आहे. मात्र या निवडणुका भाजपकडून जाणूनबूजून टाळल्या जात आहेत. दिल्ली महापालिका निवडणुका टाळणे हा शहिदांचा अवमान आहे. पराभवाच्या भितीनं भाजप महापालिका निवडणुका घेण्याचे टाळत आहे असंही ते म्हणालेत.
काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
पंजाबमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर केजरीवाल यांनी आपला मोर्चा आता हिमाचल प्रदेशच्या विधानसभेकड़े वळवला आहे. पंजाबमध्ये मिळवलेल्या यशानंतर महाराष्ट्रात देखील आम आदमी पक्ष महापालिकेत हातपाय पसरवणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात आम आदमी पक्ष महाराष्ट्रात देखील पाय रोऊन बसला तर लोकांना आश्चर्य वाटणार नाही.
Read also:
- “आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ते..”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला सतेज पाटलांचं प्रत्युत्तर
- “बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
- आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती
- पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात
- “सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार