कोल्हापूर – पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. दरम्यान याच निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. यावेळी ‘तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला’, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भुजबळांना दिला होता.
दरम्यान या वादात अनेक राजकीय नेत्यांनी उडी घेतली. याच मुद्द्यावर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आक्षेप नोंदवला होता. ‘लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही’, असे मुश्रीफ म्हणाले होते. तर गेल्यावेळीदेखील चंद्रकांत पाटील यांनी माझा अपमान केला होता. त्यामुळे आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलेल्या अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याच्या मुद्द्यावरून आता चंद्रकांत पातिल्यानी त्यांची फिरकी घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले, “हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूरात आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते
Read Also