मुंबई : शिवसेना आता कुणाची? याचा निर्णय आता निवडणुक आयोगालाच घ्यायचा आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी निर्णय कशाच्या आधारावर होणार हे आता स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता निवडणुक आयोग कुणाकडे आपला निकाल देणार ते पाहणं अत्यंत महत्वाचे आहे. त्या निकालाची वाट महाराष्ट्रासह सर्व देशात लागून राहिली आहे.
हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, महागाईच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार? रूपाली पाटलांचा सवाल
निवडणुक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे आणि या प्रकरणातही आयोगाकडून ती प्रक्रिया देखील चोख पद्धतीने पार पाडली जाईल. राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत अधिकार घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे. शिवसेनेच्या प्रकरणातही आम्ही संघटनेची बहुमत चाचणी घेऊन आम्ही निर्णय घेऊ असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करतय”; काॅंग्रेसची जहरी टिका
त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किती आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक यांची आकडेवारी निवडणुक आयोग तपासणार आहे. यामध्ये शिवसेनेचे 55 आमदार असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 15 तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 40 आमदार आहेत. त्यातच शिवसेनेचे एकुण 18 खासदार असून त्यात उद्धव ठाकरे यांच्याबाजूने 6 तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 12 खासदार आहेत.
“जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
तसेच निवडणुक आयोगाला अगोदर सगळ्या काही गोष्टी तपासून पाहव्या लागणार आहेत. त्या पक्षाची घटना, त्यात असलेले पदाधिकारी, आमदार, खासदार तसेच नगरसेवक यांची संख्या तपासून पाहावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात दाद मागता येते. पंरतु सर्वसाधारणपणे अशा निवडणुक चिन्हांबाबत हस्तक्षेप करीत नाही.
Read also
- “महाराष्ट्र मॉडेलच सर्वोत्तम पाहिजे, गुजरातला कशाला जातात”?; रूपाली पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
- “शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे
- 6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले
- “राज्यात ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेनेचा निर्णय अंधातरी”
- “भाजपचं पितळ उघडं पाडायला आम्ही सदैव तयार”; काॅंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल