मुंबई : राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजूनही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित होते.
पहिली ते बारावीच्या सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांची माहिती
सोमवारी अधिवेशनास संदर्भात BAC ची बैठक होणार आहे. त्यात अधिवेशनाची तारीख अंतिम केली जाईल. अधिवेशन मुंबईतच होणार आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आलं होतं. नागपूर करारानुसार वर्षातून एक तरी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. अधिवेशन मुंबईत घेतल्यास विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब
दरम्यान, हिवाळी अधिवेशन कुठे आणि कधी घ्यायचं याबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित होता. . मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणि अन्य कारणं देत शिवसेना अधिवेशन मुंबईत करण्यासाठी आग्रही होती. तर काँग्रेस मात्र नागपूरमध्ये अधिवेशन व्हावं यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली.
Read Also :
- ‘भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून भडकवत आहेत’, मलिकांचा आरोप
- प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल
- आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा
- स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..