मुंबई : माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे. असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड
काल शिवसेना प्रमुखांचा पक्ष मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझ्या घराण्यावर बोल आहेत. पण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, पण भाजपवाल्यांचा वंश कोणता? असा सवाल करीत इतके उपरे घेतले की, 52 कुळे आहेत की, 152 कुळे हेच समजत नाही असा चिमटा देखील त्यांनी भाजपाचा काढला. त्याचबरोबर त्यांनी भाजपचा उल्लेख पुन्हा एकदा कमळाबाई म्हणून केला. या कमळाबाईंशी मुंबईचा संबंध काय ? असा सवाल करीत यांच्यासोबत आमची युतीमध्ये 25 वर्ष सडली असं पुनर्च्चार देखील त्यांनी केला.
“पवार साहेब तुम्हीच सांगा..! 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?”; भाजपचा सवाल
त्यानंतर त्यांना बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार राहा. अमित शहांवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“भाजपला टक्कर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असं सध्या लोकांना वाटतेय”
दरम्यान, दरम्यान, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा काल मुंबईत पक्षमेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा कमळाबाई, तर शिंदे गटाचा मिंधे सरकार म्हणून यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच हिमंत असेल तर पुढच्या महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा. असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे.
Read also
- “महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
- “हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
- “निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- “शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम
- “एकनाथ शिंदें काॅंग्रेसमध्ये तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण..;” चंद्रकांत खैरेंचा मोठा खुलासा