नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भारती पवार यांनी यावेळी आरोग्य सेवक नेमणूक, आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यासंदर्भातील भूमिका, कोरोना विषाणू संसर्गाती तिसरी लाट आणि महिला सुरक्षा आदी मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात मंदिर बंद असल्यानं भारती पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
… तर राज्यात लॉकडाऊन अटळ आहे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ दिवस
राज्य सरकारकडे 3207 आरोग्य सेवकांची परवानगी मागितली होती. 2610 कर्मचाऱ्यांना सेवा परवानगी मिळाली होती. यामध्ये 597 नावं वगळण्यात आली होती. मात्र, या सर्व सेवकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोव्हीडच्या वातावरणात 597 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. काही पीएसी ला कमी डिलिव्हरी झाल्याने या आरोग्य कर्मचाऱयांना सेवेतून वगळण्यात आले होते, असं भारती पवार म्हणाल्या.
कोरोना नियम पाळून सण साजरे करायला पाहिजे. गणेशोत्सवाचा उद्देशचं प्रबोधन करणे हा आहे. कोव्हिडं बाबत गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे. ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी, असं भारती पवार म्हणाल्या. बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? कमी लोकांमध्ये मंदिर उघडण्यास काय हरकत आहे. राज्याने मंदिर उघडण्याबाबत केंद्रावर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घ्यावेत, असं भारती पवार म्हणाल्या. कोव्हिडं मध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये, असं भारती पवार म्हणाल्या.
Read Also :
- ‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
- अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी – केशव उपाध्ये
- “बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
- सरकारने विश्वास संपादन करावा, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही- राजू शेट्टी
- राष्ट्रवादीने पाळली पडत्या फळाची आज्ञा, गर्दी होईल असे सर्व राजकीय कार्यक्रम टाळणार