नवी दिल्ली : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेच्या सभागृहात देखील काॅंग्रेसच्या नेत्यांनी काळे कपडे घालून त्याचा निषेध व्यक्त केला आहे. तर देशभरात काॅंग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात आंदोलने, मोर्चे काढले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार नपुंसक,” न्यायालयाची टिप्पणी, अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले, “आत्मपरिक्षण करा…”
काॅंग्रेसकडून सातत्याने असत्याचा प्रचार केला जातो आहे. आपल्याकडे कायद्यात तरतुद आहे की जर कुठल्याही राजकीय व्यक्तीला २ वर्षाची शिक्षा झाली तर आपल्या शिक्षेवर स्टे आणण्यासाठी त्या व्यक्तीला तीन महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र ती तरतुद शिक्षेवर स्टे आणण्यासाठी असते जो दोषावर स्टे आणण्यासाठी नाही. राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यांनी त्या शिक्षेवर स्टे आणण्यासाठी अपील का केलं नाही. ही नेमकी कोणती मुजोरी आहे. गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ? असा सवालही अमित शहा यांनी केला आहे.
हेही वाचा…हिंदू शेरनी..! भगवं उपरणं, काळा ड्रेस, अन् बुलेटवर स्वारी, नवनीत राणांचा हटके व्हिडीओ
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टिप्पणी केली होती. त्याच्याविरोधात भाजपने गून्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर आपोापच राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं.
Read also
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील