पुणे: कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून पुण्यातील जम्बो कोविड सेंटर बनवल गेलं. आता इतक्या दिवसांनंतरही कोविड सेंटरममध्ये रुग्णांना चांगली सुविधा महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार देऊ शकलेल नाही. हे जंबो रुग्णालय नेमकं रुग्णांचे उपचार करायला कि अवहेलना करायला बांधल गेल आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या कोविड सेंटरमध्ये प्रिया गायकवाड नामक तरुणी उपचारासाठी दाखल झाली होती.
मात्र, आज २७ दिवस उलटून गेले तरी देखील या मुलीशी तिच्या कुटुंबियांचा संवाद झालेला नाही. यामुळे शंका निर्माण झाल्याने तसेच प्रशासन याबाबत व्यवस्थित माहिती देत नसल्याने या मुलीच्या कुटुंबीयांनी कोविड सेंटर बाहेर धरणं आंदोलन सुरु केलं आहे आणि हद्द तेव्हा झाली जेव्हा दैनिक पुढारीच्या वृत्तानुसार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरी महापालिका सर्वपक्षीय गटनेत्यांनी जंगी पार्टी झाली. हा असंवेदनशीलतेचा कळस आहे अशा जबाबदार पदांवरील व्यक्तींनी बेजाबदार पद्धतीने वागणे पुण्याला शोभणारे नाही.
कोविड सेंटरमधून गायब झालेल्या तरुणीची आई रागिणी सुरेंद्र गमरे म्हणाल्या, “माझी मुलगी रागिणी हिला २९ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर संध्याकाळी येथून फोन आला की, तुमची मुलगी काहीही ऐकत नाही, त्यामुळे तुम्ही येथे यावं. त्यानंतर मी येथे आले आणि माझं डॉक्टरांशी बोलणं झालं. डॉक्टर म्हणाले, मुलीला १३ सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात येईल, तेव्हा तुम्ही पुन्हा रूग्णालयात यावं. त्यानुसार मी १३ तारखेला मुलीला नेण्यासाठी पुन्हा येथे आले मात्र, तुमची मुलगी आमच्याकडे उपचारासाठी नाही, असं उत्तर मला इथं देण्यात आलं. त्यानंतर इथल्या व्यवस्थापनाकडून मी माझ्या मुलीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. माझ्या मुलीचं काय झालं असेल हा प्रश्न मला सारखा सतावत आहे.
आज २७ दिवस झाले तरी माझं तिच्याशी बोलणं झालेलं नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालून माझी मुलगी मला मिळून द्यावी” काही दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर यांचं जम्बो कोविड सेंटरमधील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निधन झाले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात सरकार आणि प्रशासनाला लक्ष्य केल गेल होत. तरीही यातून काही धडा राजकारणी आणि प्रशासनाने घेतलेला नाही. आता एक मुलगी रुग्णालयातून हरवल्यानंर महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री अजित पवारांचं पुण्यावर किती लक्ष्य आहे याचाही अंदाज येत आहे.
पुणे कोरोना महामारीच्या संकटात पुरते अडकले आहे. कोविड जम्बो सेंटरची अवस्था तर पुरती खालावली आहे. पुणेकर मरणाच्या दारात अडकले आहेत. मात्र पुण्यातील राजकीय मंडळींना याच काहीच सोयीरसुतक दिसत नाही. पुणेकर मरण यातना भोगत असताना राजकीय मंडळींची ही पार्टी नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याच कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
यात धक्कादायक बाब म्हणजे दुपारी काँग्रेसने पालिका कर अभय योजनेवरून भाजपला कमालीचे धुतले होते, आणि रात्री झालेल्या कथित पार्टीचे नियोजन मात्र काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याकडून केल्याचे बोलले जात आहे. अशात मोठ्या आवेशात आम्हीच पुणेकरांचे कैवारी सांगण्याऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांचा बुरखा टराटरा फाटला आहे. मुळातच पुण्यातील परिस्थिती गंभीर असताना अशी पार्टी करण्याची ही वेळ आहे का आणि याचे भान महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांना नाही का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
Read Also;
मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये अन्यथा ….https://t.co/RK5P8mGCER
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020