मुंबई : महाविकास आघाडीकडून लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केलाय. मनसेच्या विरोधी भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. मनसेचा लखीपूरमधील हत्येला पाठिंबा आहे का?, असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या टीकेला आता मनसेच्या चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे; रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी
जनतेच्या जीवाशी खेळ करुन राजकारणाची पोळी भाजणारी महाभकास आघाडी. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारुन राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील!
कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी, उद्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या समोरच नावं जाहीर करणार – नारायण राणे
शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा. निषेध म्हणून दोन तास अधिक काम करा. जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच. नाही करणार माझा महाराष्ट्र बंद, अशा शब्दात खोपकर यांनी मलिकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
11 ऑक्टोंबरच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून; शिवसेना पुर्ण ताकतीने सहभागी होणार
राष्ट्रवादीच्या वतीने आज बंदच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात निदर्शने केली. यावेळी नवाब मलिकही उपस्थित होते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मलिक यांनी लखीमपूरच्या हिंसेवरून मनसेला धारेवर धरले. लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला.
Read Also :
- उद्धवजी, शिवसेनेच्या जीवावर राष्ट्रवादी मोठी होत आहे, महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला – चंद्रकात पाटील
- भाजप नेत्या पंकजा मुंडे राज्यापाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला; राजकीय तर्कवितर्कांना उधान
- शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर; चेंबूर येथे वाहतूक रोखली, दुकाने बंद करण्याचे आवाहन
- बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी दम असेल तर रस्त्यावर उतरुन दाखवावं; राऊतांचा इशारा
- बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; महाराष्ट्र बंदवरून अशिष शेलारांचा हल्लाबोल