मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच ओबीसी समाजाला उद्देशून एक संतापजनक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. ओबीसी समाजावरती माझा फार काही विश्वास नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.
… अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
कारण जेव्हा जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण जेव्हा लढायची, मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा ओबीसी समाज मैदानात उपस्थित नव्हता असं विधान आव्हाड यांनी केलं होतं. यानंतर आज पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आज सकाळी ट्विट करत म्हटले आहे की आज माझ्या घरावर एक मोर्चा येणार आहे. या मोर्चाची चांगली तयारी करण्यात आली आहे. पुण्याहून खास या मोर्चासाठी दोन बस येणार आहेत.
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
यातील एकाला सांगण्यात आलं आहे की तू कॅडबरी जंक्शन जवळ उतर तर दुसऱ्याला सांगितलं आहे की तू माजिवाडा नाक्यावर उतर. जर पोलिसांनी आज मला बंदोबस्त दिला नाही तर …… जय भीम अशा आशयाचं ट्विट करत आव्हाड यांनी एक प्रकारे गंभीर इशारा दिला आहे.
उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा…….
जय भीम!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2022
त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर संकट येणार का ? असं देखील बोललं जात आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देशील आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याबाबद्दल विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी त्यावर बोलणे टाळले होते. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. कोण काय बोललं याचं मला काही देणंघेणं नाही. मी माझी मतं स्प्ष्टपणे मांडत असतो असं देखील अजित पवारांनी पत्रकारांना म्हटलं होतं.
Read also:
- रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
- राज्यात लॉकडाऊन लागणार? टास्क फोर्सची बैठक संपली, काय ठरलं नेमकं, वाचा सविस्तर…
- कोकणात शिवसेनेमुळेच दहशत, खून, अपहरण या गोष्टी झाल्या असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? – राणेंचा सवाल
- ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं; अश्रूंचा टाहोफोडत सिंधुताईंच्या लेकीच आवाहन
- आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू अडचणीत; ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमक प्रकरण…