मुंबई : अहमदनगरच्या कर्जतमध्ये एका तरूणाला धमकावून टोळक्याने कोल्हे प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. नुपूर शर्माचे समर्थन केल्याने कर्जत मध्ये अमरावतीसारखा प्रकार घडला आहे. याविषयी भाजप आमदार नितेश राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आक्रमक भुमिका घेतली आहे. यामुळे आता राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
“राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”
कर्जतमध्ये नपुर शर्मा यांना समर्थन दिल्याने प्रतिक , उर्फ राजेंद्र पवार या युवकावर गुरूवारी रात्री एका गटाने हल्ला केला. भाजपच्या निंलबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून कऱण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्ह्या रूग्णालयात नेण्यात आलं आहे. आम्ही कोणाच्या धर्माविरूद्ध, कोणाच्या देवी देवतांच्या विरूद्ध नाही पण आमच्या देशाच्या रक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतील. त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रवृत्त कराल तर आम्ही त्या गोष्टी करण्यासाठी तयार आहोत. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर आता अमरावतीसारखेच कर्जत मध्ये घडलेलं आहे. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हिंदुंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असं नितेश राणे म्हणाले.
“आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी सरकार नाही. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत. महाराष्ट्रात आता शिंदे-फडणवीस हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंवर अत्याचाराच्या किंवा हिंसेच्या घटना घडल्या तर आम्ही हिंदु म्हणुन जशास तसं उत्तर देऊ असा स्पष्ट संदेश मला द्यायचा आहे, असं नितेश राणे म्हणाले.
पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट
आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तर आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं एकलं का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हीही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी जशास तसे उत्तर देऊ, हिंदुंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावायचा प्रयत्न करू नका असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
Read also
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
- “मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
- “काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
- नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
- आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित