मुंबई: नायगाव पोलिस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस सरकारकडून बजावण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने पोलिस वसाहतीला भेट दिली. दरेकरांनी पोलीस कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेतलं.
हे पण वाचा: “ओबीसींसाठी कळवळा असेल तर त्वरित सत्तेतून पायउतार व्हा!” चंद्रशेखर बावनकुळेंचे काँग्रेसला आव्हान
नायगाव येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना अचानक घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कडाडून विरोध केला आहे. वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
पर्यायी व्यवस्था न करता,नायगाव येथील पोलीस वसाहतींमधील कुटुंबियांना खोल्या रिकामी करण्याची नोटीस देणे दुर्दैवी असून, अशाप्रकारे पोलिसांच्या कुटुंबियांना घराबाहेर काढण्याचा प्रकार चुकीचा आहे.सरकार पळ काढत असेल तर आम्ही मदत करू मात्र पोलिसांना बाहेर पडू देणार नाही.@CMOMaharashtra pic.twitter.com/FjN64LMWYd
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 3, 2021
हे पण वाचा: ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
पोलिसांना घर सोडण्यास सांगितले जात आहे, पण त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. कोविड काळ असो की सण… कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अविरत मेहनत करून जनतेचे संरक्षण करणारा माझा पोलिस रस्त्यावर राहणार का? आम्ही असे होऊ देणार नाही.
हे पण वाचा: मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
प्रसंगी त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करू. राज्य सरकार पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी लागणा-या आवश्यक निधीपासून पळ काढत असेल तर गरज पडल्यास येथील राहिवाशांसाठी विधानसभेतील आमदार मिळून एकत्रित निधी दुरुस्तीसाठी देऊ. परंतु पोलिस बांधवांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी, संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करा – नाना पटोले
- शरद पवार आणि अमित शहा यांच्यातल्या भेटीचा उलघडा, मात्र ‘त्या’ १५ मिनिटांच्या भेटीत काय झालं?