हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. त्यावर ते असं म्हणाले की, त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेऊन हेलिकॅप्टरने प्रचार केला. याचा जास्तीत जास्त फायदा निवडणुकीत मतविभाजन होऊन भाजपला झाला असा आरोपही त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर केला होता.
पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी
आता याच आरोपाला वचिंत बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या पाचवी शिकलेल्या अल्पशिक्षित संतोष बांगर नावाच्या आमदाराला आता १२ नंतरच्या शिक्षणास घालायला हवे म्हणजे त्याला थोडीशी अक्कल येईल.
मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला
त्याला आता अंकगणित, बाराखडीही द्यावी लागणार आहे. त्याला साक्षर करण्यासाठी आता आम्ही मैदानात उतरलो आहोत. बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आला आहे. लवकरच त्या ‘आमदार बांगरला घोडा लावू’ असा टोला वंचितचे वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव आणि मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे यांनी हाणला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचा जुगार चालवत आपली रोजी रोटी भागविणारा आमदार संतोष बांगर वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना १ हजार कोटींचे पैसे घेतल्याचा आरोप करतो. .हा आरोप करताना त्याने त्याच्या अकलेचे तारे तोडले आहेत. आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याला आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून या अडाणी बांगरला एक हजारावरील शून्य वाचण्याची अक्कल येईल. आमदार बांगर ह्याने दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे. याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागतील असा इशाराही राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
Read also:
- मोठी बातमी : 5 एप्रिलला राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
- बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल
- ” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब
- सतेज पाटीलांसह त्यांच्या कुटुंबिंयाबाबत ईडीकडे तक्रार करणार; कोल्हापूर उत्तरेत राजकारण तापलं
- “ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली