मुंबई: महाराष्ट्र भाजपचे बडे नेते राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. त्यात काल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भाजप नेते, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची महत्वाची बैठक सुरु झालीय.
हे पण वाचा: आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, निरंजन डावखरे, राधाकृष्ण विखे-पाटील, राम शिंदे, मनोज कोटक, संजय कुटे, जयकुमार रावळ यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्वाचे नेते आणि खासदार उपस्थित आहेत. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, संघटनात्मक बदल, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती या विषयांवर या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा: २०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी ५० टक्के मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे. इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केलं आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीये. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे.
हे पण वाचा: मोदी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना अधिकारच किती? दानवे फक्त बोलघेवडे मंत्री, मलिकांचा शाब्दिक हल्ला
एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होत. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असं ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Also :
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान
- मुंबई लोकल प्रवास करायचा आहे! पूर्ण करावी लागणार अजून एक अट
- “पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
- “खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…”, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
- नाशकाताही राष्ट्रवादी-शिवसेनेत ठिणगी; उड्डाणपुल उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन भुजबळ, शिवसेना खासदारावर नाराज