अहमदनगर: अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात जरी असली तरी नगर च्या महाविकास आघाडीमध्ये मोठी धुसपूस आहे. नगर शहरात शिवसेना, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नुकतीच विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती. नगर शहरामध्ये कोरोनाच्या महामारीशी लढण्यासाठी इतक्या वर्षात साधे एक हॉस्पिटल देखील उभारता आले ही शोकांतिका आहे. त्यानंतर काँग्रेस चे कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी राष्ट्रवादीला प्रसिद्धी पत्रक काढून अनेक सवाल उपस्थित केले होते. अनेक वर्ष अहमदनगर शहरात महापौर, आमदार आणि विधान परिषद आमदार अशी पदे उपभोगत असताना साधे रस्ते सुद्धा करता आले नाही अशी टीका या प्रसिद्धिपत्रातून केली गेली होती.
आता त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विपुल शेटिया NCP corporator Vipul Shetiya यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारेच उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे बेलगाम घोड्या सारखे उधळू लागले आहेत. त्यांनी सातत्याने आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आमदार संग्राम जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांचे कोविड – १ ९ च्या काळातील योगदान अतिशय उल्लेखनीय व संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत आहे . कोरोना महामारीच्या काळात असंख्य गोरगरीब, गरजुवंतांना विनामुल्य रेशन वाटप, औषधे व रुग्णालयातील औषधोपचार इ. सर्व सेवा – सुविधा आमदार संग्राम जगतापांनी दिल्या आहेत. भीतीपोटी स्वतःच्या घरातील व्यक्तीनातेवाईक जवळ येत नसताना संग्राम जगतापांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना धीर देऊन स्वतः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे.
विधान परिषद आमदार अरुणकाका जगताप यांच्यामुळे आनंदऋषी हॉस्पिटल ला जागा मिळाली. आज हजारोंच्या संख्येने रुग्ण अत्यंत अल्प दरात इथं उपचार घेत आहेत. सन्माननीय आमदार साहेबांबद्दल कोणीही येऱ्या गैयाने अर्वाच्य व वाचाळपणे केलेले वक्तव्य नगरची सुज्ञ व विचारवंत जनता कधीही सहन करणार नाही. मनोज गुंदेचा यांचे शहरासाठी कोणतेही योगदान नाही. त्यांनी आधी स्वतःची ओळख निर्माण करावी पाहिलं त्यांनी समाजासाठी झटावे व नंतर प्रश्न विचारावेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचा लहामटे गट आणि काँग्रेसचा थोरात गट वाद
मागील आठवड्यात महसूलमंत्री थोरात यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात आढावा बैठक घेऊन उपाययोजना सूचवल्या सुचवल्या होत्या गोधळ निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन मालुंजकर यांना सभागृहातून बाहेर काढल्यावर बैठक पार पाडली. घटनेनंतर राजकीय वर्तुळात वादळ उठले. या महाआघाडीच्या तत्वाला हरताळ फासल्याचा आरोप काँग्रेसने राष्ट्रवादीवर केला केला होता. तसेच आमदार लहामटे यांना यापुढील काळात जर काँग्रेस पक्षासोबत राहून काम करावे असे वाटत असेल, तर राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पदाचा राजीनामा घ्यावा व या कृत्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते कोणत्याच पातळीवर राष्ट्रवादीबरोबर काम करणार नाहीत, असा सज्जड इशाराही वाकचौरे यांनी त्यावेळी दिला होता.