मुंबई – माझा ओबीसींवर विश्वास राहिला नाही, असं विधान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. विरोधकांनी आव्हाडांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. तेसच यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकेबाजी केली.
पोलिसांचा बंदबोस्त नसल्यास …….. जय भीम ; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट ने खळबळ
“उगाच कुणाच्या तरी अंगावर जायचं… मला काही कळतच नाही… आंदोलन कुठे? माझा पुतळा जाळा… माझ्याविरोधात मोर्चा काढा… कलेक्टर ऑफिसला निवेदन द्या… दरवेळेस माझ्या घरासमोर… मी ज्या घरात राहतो, माझं जे पर्सनल घर आहे त्याच्यासमोर आंदोलन करणं हा नवीन प्रकार कधीपासून सुरू झाला? कधीपासून सुरू झाला… मी 35 वर्ष राजकारणात आहे. माझ्या एवढी आंदोलनं राज्यात कोणी केली नसेल. मला त्याचा गर्व आहे. पण मी कधी कुणावर पर्सनल अटॅक केला नाही. कुणाच्या घरावर चालू नाही गेलो. कुणी एकटा चालला असेल तर त्याला गोळ्या नाही घातल्या. हे काय चालू आहे?” असा टोला आव्हाड यांनी विरोधकांना लागावला.
“आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या घरावर जाणार… आणि माझे कार्यकर्ते जमले की तुम्ही टीव्हीवाले दाखवणार की जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर गर्दी. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. माझ्या घराबाहेर येता कशाला? माझी एक पोरगी असते तिथे. माझी एक बायको असेत तिथे आणि चार पाळलेले कुत्रे असतात. मी घरात कधीच नसतो. मग माझ्या घरावर जाऊन काय प्राप्त होणार होतं. ही स्टंटबाजी असते. पॉलिटिकल स्टंट आहे. खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी. त्यांचा काय दोष? त्यांना घरात स्वत:ला कोंडून घ्यावं लागतं. का असं करता? मी लढायला तयार आहे. मैदानात आहे ना… मी माझा एक टक्का शब्दही मागे घेतलेला नाही. “असे आव्हाड म्हणाले.
Read also:
- मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट; भाजप नेते जितेन गजारीया पोलिसांच्या ताब्यात
- विमानतळ जागेचा वाद पुन्हा पेटणार: भाजपा आमदार महेश लांडगे म्हणतात… विमानतळ खेडमध्येच पाहिजे!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- मुंबई लोकल पुन्हा बंद? राज्यात विकेंट लॉकडाऊन लागणार? राजेश टोपेंचं मोठं विधानं
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार; परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी