नवी दिल्ली : राजधानीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा सुरु आहे, ती शरद पवार तसेच, इतर विरोधी पक्षनेते घेत असलेल्या एकमेकांच्या भेटीगाठींची. हा सिलसिला अजूनही जारी असून, आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, विरोधी पक्षांच्या खासदारांना ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’च्या निमित्ताने एकत्र बोलावून बैठक घेतली. यात मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यात आल्याची चर्चा आहे.
“राहुल गांधींना मातोश्री, बाळासाहेब आणि शिवसेना जाणून घेण्यात इंटरेस्ट”- संजय राऊत
दरम्यान, या बैठकीत भाजपला थांबवायचं असेल, तर ‘एकी हेच बळ’ आहे असं सांगत, विरोधी पक्षांना राहुल गांधींनी एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. “माझ्या दृष्टीकोनातून आपण एक असणं, हीच आपली ताकद असणार आहे. या हुकूमशाही विरोधात जेवढे लोक एकत्र आवाज उठवतील, तेवढा हा आवाज आणखीन बुलंद होईल आणि मग तो दाबून टाकणं भाजप-संघासाठी अवघड होईल”, असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला देशातील १४ पक्षांचे जवळफास १०० खासदार उपस्थित होते.
केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून, पेगॅसस प्रकरण, कोरोना संकटाची हाताळणी, शेतकरी आंदोलन आणि इंधन दरवाढ हे मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर आहेत. पेगॅससच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली आहे, पण सरकारचा नकार असल्यानं संसदेचं कामकाज ठप्प झालं आहे. ही कोंडी फोडण्यासाठी राहुल गांधी सरसावले असून, त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या या आजच्या बैठकीत, “देशहिताच्या मुद्दय़ांवर केंद्र सरकार संसदेत चर्चा करू देत नसल्याने आम्ही ‘समांतर संसद’ भरवण्याची तयारी चालविली आहे”, अशी माहिती काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे. त्यामुळे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान मोडून काढायला विरोधकांनी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे.
श्री @RahulGandhi जी विपक्ष के वरिष्ठ सांसदों के साथ नाश्ते पर चर्चा करते हुए।
देश के लोकतंत्र पर भाजपाई प्रहार के खिलाफ विपक्ष एकजुट है। यह देश बचाने की लड़ाई है। #UnitedForDemocracy pic.twitter.com/E9ZdVYGE3O
— Congress (@INCIndia) August 3, 2021
Read Also :
- २३ गावांच्या विकास आराखड्याला हाय कोर्टाची स्थगिती; ठाकरे सरकारला दणका
- आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
- “…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
- पेगासस फोन टॅपिंग प्रकरणी: मोदी-शहांवर विश्वास नाही, मित्र पक्षातील बड्या नेंत्याची चौकशीची मागणी
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन