मुंबई: पेगासस प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससवर चर्चा व्हावी. या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. पण सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
हे पण वाचा: पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर आरोप केले. ‘केंद्र सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही, हे तुम्हाला सरकार सतेत आल्यापासून जाणवत असेल. संसद चालवणं सरकारची जबाबदारी असते, पण त्यांची ही इच्छा दिसत नाही. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. चर्चेवेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावं, त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची का किंवा जेपीसी नेमायची का हा नंतरचा विषय आहे’, असं राऊत म्हणाले.
हे पण वाचा: ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
देशाच्या सुरक्षेसाठी तुम्ही तीन तास देऊ शकत नाही ?
तसेच, ‘पेगासस हेरगिरी हा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ते ऐकलं पाहिजे. सरकार त्यापासून का पळ काढत आहे ? इतक्या गंभीर विषयावर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेला तीन तास देऊ शकत नाही का? आम्ही फक्त तीन तास मागत आहोत. देशासाठी. आणि सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
हे पण वाचा: भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
संकटातूनच चेहरे निर्माण होतात
सर्वांनी एकत्र यावं, अशी ममतादीदींची इच्छा आहे. त्यांचं विधान ऐकलं. आधी एकत्र येऊ. काम करू. नेता आणि चेहरा नंतर ठरवू, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही आमची सदिच्छा आहे, असं सांगतानाच नेता आणि चेहरा ठरवणं कठिण आहे हा तुमचा गैरसमज आहे. योग्य वेळ येताच एकमत होतं. गरजेतून आणि संकटातून असे चेहरे आणि नेतृत्व निर्माण होत असतं, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- राज्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत,आज मंत्री मंडळात निर्णय होण्याची शक्यता
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
- भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा