नाशिक : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर आणि गोवा या राज्यांत भाजपने आघाडी घेतली असुन त्याठिकाणी बहुमत मिळवलं आहे. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेेनेला टोला लगावला आहे.
मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी दयनीय होणार आहे. त्या निवडणुकीत तीन-चार जागा निवडणुन येतील की नाही. अशी शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे.
उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम हैं! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदीचं कौतुक केलं. त्यावेळी ते म्हणाले की, चार राज्यात भाजपचा दणदणीत विजय झालाय. यामागचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. त्यांनी देशात वेगवेगळ्या योजना आणल्या. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवले. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे, असंही ते म्हणालेत.
गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
पंजाब अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षांने मोठा विजय मिळवला आहे. त्यांचे त्याबद्दल मी अभिनंदन करतो. तसेच पुढच्या निवडणुकीत त्यांना आणि सत्ता बाहेर फेकून देऊ, असा आत्मविश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्रात लवकरात लवकर सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं आहे.
Read also:
- भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
- महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार! काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांचं वक्तव्य
- आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा सुपडा साप! राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया