मुंबई : ९ ऑक्टोबरला १२:३० वा. चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. याला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असून, या निमित्ताने पहिल्यांदाच राणेंच्या अटक ‘कार्यक्रमा’नंतर ठाकरे आणि राणे आमने-सामने येणार आहेत. मात्र, त्याआधीच राणेंनी, ‘या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हवेत कशाला?’ असा सवाल करत वातावरण तापवलं आहे.
चिपी विमानतळ श्रेयवादावरून राजकारण तापलं, पुन्हा पाहायला मिळणार राणे-मुख्यमंत्री संघर्ष?
दरम्यान, यावर आता राज्यतल्या भाजपच्या पहिल्या फळीतील काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “ही श्रेयवादाची कोणती लढाई नसून केंद्राने आणि राज्याने समन्वयाने काम करायचे असते. चिपी विमानतळाच्या कामात राणेंचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. आता जेव्हा विमानतळ सुरु होणार आहे. तेव्हा वाद न करता, यामुळे कोकणच्या पर्यटनाला चालणा मिळणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे,” असं सावध उत्तर दिले.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
दुसरीकडे, भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना यावर हातचे राखून प्रतिक्रिया दिली असून, “मी प्रोटोकॉल अधिकारी नाही. पण राज्याचा नागरिक म्हणून मला वाटतं की, भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झालं असेल, पण तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी देखील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे, असं माझे मत आहे,” असं ते म्हणाले.
“बेळगावला महाराष्ट्रात घेण्याचा ठराव संमत करून दाखवा!” राऊतांचं भाजपला आव्हान
याआधी देखील भाजप नेत्यांनी, नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याचं विधानावर फारकत घेऊन, आम्ही त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत नाही पण व्यक्ती म्हणून त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईला आमचा विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एकमत असल्याचे न दर्शवल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Read Also :
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत – किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवारांनी मंत्री पदाचा राजीनामा देवून हातभट्टी विकायचा धंदा टाकावा – भाजप
- बेळगावात मराठी माणसाचा नाही, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला – देवेंद्र फडणवीस
- बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको – विनायक राऊत
- “तुम्ही मराठी माणसाला सत्तेसाठी वाऱ्यावर सोडलं,” राऊतांवर भाजपचा पलटवार