किस्तानी कैदेत असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना विनाशर्त कन्स्युलर अॅक्सेस देण्याची मागणी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानकडे केली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याआधी सुद्धा भारताने ही मागणी लावू धरलेली होती. आयसीजेच्या अनुसार कन्स्युलर अॅक्सेसआणि स्वतंत्र निपक्ष पद्धतीने ट्रायल व्हायला पाहिजे. आता याबाबतचे निवेदन आज परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृतपणे देण्यात येणार आहे.
कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर समजून पाकिस्तानने अटक केली होती गेल्या चार वर्षांपासून कुलभूषण जाधव यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. पण प्रत्येक वेळेस पाकिस्तानकडून जिनेव्हा कराराच्या अंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आतासुद्धा भारताने त्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. म्हणून भारताने विनाशर्त कन्स्युलर अॅक्सेस कुलभूषण जाधव यांना द्या, अशी मागणी पाकिस्तानकडे केली आहे.गेल्या वर्षी पाकिस्तानने जाधव यांच्या आई-वडील आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. हे कृत्य भारताचा अपमान करणारे होते. त्यामुळे आम्हाला वाटते विनाशर्तकन्स्युलर अॅक्सेसद्यावा, असे कुलभूषण जाधव यांचा बालपणीचा मित्र म्हणाला.