नवी दिल्ली : देशातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक राज्य लसीच्या तुटवड्याचा सामना करत आहे. यातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या वर्षाअखेर पर्यंत सर्व प्रौढांचं लसीकरण केले जाणार असल्याचे म्हटले आहे.
देशात जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर 1 मे पासून 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास देखील सरकारने परवानगी दिली होती. आतापर्यंत देशात जवळपास 20 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, आता वर्षाअखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या वर्षाअखेरीस भारत 267 कोटी कोरोना लशीचे डोस खरेदी करणार आहे. तसंच सगळ्या प्रौढांचं लसीकरण करता येईल, अशा स्थितीत आपण आहोत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तसेच, जुलै अखेरपर्यंत लशीचे 51 कोटी डोस उपलब्ध केले जातील आणि ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान आणखी 216 डोस कोटी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
आता दररोज 25 लाख जणांची कोरोना चाचणी करत आहोत. 18 एप्रिल देशात एका दिवसात 20 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हा एक जागतिक रेकॉर्ड असल्याचेही ते म्हणाले.
Read Also :
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, विरोधानंतर आता जुन्याच दरात खत उपलब्ध करणार
- ‘नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत’
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल…’
- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राची दखल, थेट केंद्रीय मंत्र्याने फोन करत दिले आश्वासन
- राजीव सातव यांना श्रद्धांजली सभेचं आयोजन, काँग्रेस नेते झाले भावूक