“महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही,” असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
यावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “शुभ बोल रे नाऱ्या… राज्य सरकार चांगलं काम करत आहे. कामाचं कौतुकही केलं पाहिजे,” असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
“शुभ बोल रे नाऱ्या एवढंच मी म्हणेन. सरकार चांगलं काम करत आहे. त्यावर चांगलं बोललं पाहिजे. सरकार चांगलं काम करतंय. सरकार जनतेच्या पाठीशीही उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे. त्यातील कमतरता आम्ही भरून काढू. पण सरकारच्या चांगल्या कामांचं कौतुकही व्हायला हवं,” असं देसाई म्हणाले.