मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आज जिल्ह्यात १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. दरम्यान, समर्थकांच्या भावना लक्षात घेता माजी मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मंगळवारी समर्थकांशी चर्चा करुन, त्या आपली पुढची राजकीय वाटचाल ठरवण्याची शक्यता असून, शिवसेनेत जाण्याचा पर्याय त्या निवडू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यातच काल त्यांनी अचानक दिल्ली वारी करत, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली, या भेटीत त्यांनी आपली नाराजी नड्डा यांच्यासमोर व्यक्त केली असल्याची चर्चा असून, यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत भाजप नेते विनोद तावडे व विजया रहाटकरही त्यांच्यासोबत असल्याचे समजते.
मात्र, तरीही मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र काही अजूनही थांबण्याचं नाव घेत नसून, पंकजा समर्थक आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत हे राजीनामे पंकजा मुंडेंच्या समोर सादर केले जाणार असून, त्यामुळे, उद्याच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
दरम्यान, राजेंद्र मस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रं लिहून, बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांची भावना त्यांच्यापुढे मांडली आहे. प्रीतम मुंडे यांनादेखील मंत्रिमंडळात स्थान मिळणं कसं योग्य होतं, या बाबीकडेही मस्के यांनी पाटील यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे, या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी, काय निर्णय घेईल हे पाहावे लागणार आहे. या राजीनामा सत्रामध्ये बीडमधीलच नव्हे; तर राज्यभरातील पंकजा समर्थकांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले असल्याचे सांगितले जात आहे.
Read Also :
- पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? राऊत यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
- जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवलेंची मोठी मागणी
- तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप